Ad will apear here
Next
‘मनःसृष्टी’तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
पुणे : ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्षमा’ हा यंदाच्या निबंध स्पर्धेचा विषय असून या विषयावरील निबंध ३१ जुलैपर्यंत मनःसृष्टीच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष निखिल वाळकीकर यांनी केले आहे.  

शब्दमर्यादा, वय, भाषा असे कोणतेही बंधन नसलेल्या या निबंध स्पर्धेत मानसिक आरोग्याशी निगडीत असलेल्या ‘क्षमा’ या महत्त्वाच्या घटकावर आधारित लिखाण अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. निबंध पूर्णपणे स्वतःच्या अनुभवांवर आधारित असावा अशी अट संस्थेच्या वतीने घालण्यात आली आहे. 

या स्पर्धेबाबत संस्थेच्या सचिव वैशाली व्यास यांनी अधिक माहिती दिली आहे. तुमच्या आयुष्यातील व्यक्ती आणि संबंधित प्रसंग, त्या व्यक्तीमुळे झालेले शारीरिक, मानसिक, सामाजिक अथवा आर्थिक नुकसान, तिला तुम्ही माफ करू शकला आहात, की नाही, नसल्यास काय भावना आहेत, केले असल्यास आता तुमच्या आयुष्यात काय फरक पडला आहे, तुम्ही कोणाची क्षमा मागितली आहे का, कोणी तुम्हाला माफ केले आहे का अथवा अजून केलेले नाही, तुम्ही स्वतःला कधी माफ करू शकलात का, कोणत्या प्रसंगात करू शकला नाहीत, क्षमा करणे अथवा मागणे तुम्हाला महत्त्वाचे वाटते का आणि का वाटते? क्षमा करणे म्हणजे नेमके काय, असे तुम्हाला वाटते? अशा अनेक मुद्द्यांवर, स्वतःच्या अनुभवावर आधारित सदर निबंध असावा. थोडक्यात, तुमच्या मनाच्या खोल कप्प्यात असलेल्या काही गोष्टी या निबंधात व्यक्त केलेल्या असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

‘या वर्षी निबंध स्पर्धा होणार, की नाही याबद्दल अनेकांनी विचारणा केली, त्यामुळे खूप छान वाटले. हा उपक्रम लोकांना आवडतो आहे, हे लक्षात आले आणि समाधानही वाटले. निबंधातील मजकूर आणि इतर गोष्टींबाबत नेहमीप्रमाणे ‘मनःसृष्टी’कडून संपूर्ण गोपनीयता राखली जाईलच. भावना आणि विचारांना व्यक्त करणे, ही भावनिक नियमनाची पहिली पायरी आहे आणि याच हेतूने आम्ही ही निबंध स्पर्धा आयोजित करत आलो आहोत. जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या भावना मांडाव्यात असे आवाहन मी संस्थेच्या वतीने करत आहे’, असे वैशाली व्यास यांनी म्हटले आहे.

निबंध पाठवण्यासाठी पत्ता आणि संपर्क :
वैशाली व्यास, (सचिव, मनःसृष्टी) (माइंड मिरॅकल्स : रिफ्रेमिंग द माइंड)
१०२, पायल सोसायटी, गल्ली क्र. १४, प्रभात रस्ता, एरंडवणा, पुणे – ४
मोबाईल : ९८८१२ ०४२६७, ९०२८० ९५०३२

(सूचना : निबंध प्रत्यक्ष आणून देणार असल्यास, कृपया आधी फोन करावा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSBCC
Similar Posts
‘चित्रस्पंदन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘स्व-विकासासाठी चित्रपट महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित ‘चित्रस्पंदन’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात आणि आठ जानेवारी असे दोन दिवस हा महोत्सव चालणार असून, मनाला भिडतील असे काही चित्रपट, लघूपट आणि गप्पांची मैफल असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेस’च्या पुणे उत्तर शाखेतर्फे पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्यावसायिकांचा राजकारणात सहभाग’ असा निबंध स्पर्धेचा विषय असून १५ फेब्रुवारीपर्यंत ई-मेलद्वारे किंवा संपर्काद्वारे निबंध पाठवणे अपेक्षित आहे.
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language